शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
4
ग्रीन झोनमध्ये शेअर बाजाराची कामकाजास सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह 'हे' शेअर्स उघडले
5
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
6
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
8
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
9
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
10
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
11
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
12
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
13
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
14
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
15
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
16
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
17
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
18
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
19
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
20
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस

देशामधील सध्याचे वर्तमान, वास्तव भयावह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:20 IST

इस्लामपूर : देशातील आजचे वर्तमान आणि वास्तव भयावह आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश या विचारवंतांना गोळ्या घालून ठार केले जाते. धर्मांध शक्तींच्या कृत्याने तरुणाईची ताकद आणि श्वास गुदमरतो आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उध्दव कानडे यांनी केले.येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातील कर्मवीर साहित्य नगरीत ...

इस्लामपूर : देशातील आजचे वर्तमान आणि वास्तव भयावह आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश या विचारवंतांना गोळ्या घालून ठार केले जाते. धर्मांध शक्तींच्या कृत्याने तरुणाईची ताकद आणि श्वास गुदमरतो आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उध्दव कानडे यांनी केले.येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातील कर्मवीर साहित्य नगरीत राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व प्रतिष्ठान पुणे या संस्थेने आयोजित केलेल्या १९ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन कानडे बोलत होते. ज्येष्ठ विधीज्ज्ञ अ‍ॅड. भास्करराव आव्हाड यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन झाले. डॉ. मनोहर जाधव यांना ‘प्रा. रा. ग. जाधव साहित्य साधना पुरस्कार’ देऊन गौरविले.यावेळी सौ. सरोजमाई पाटील, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, प्रकाश रोकडे, आर. डी. पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, मधुश्री होवाळ, अ‍ॅड. एन. आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनाला सरोजमाई पाटील यांनी रोख ५ हजार रुपयांची देणगी व्यासपीठावरच स्वागताध्यक्षांकडे सुपूर्द केली.कानडे म्हणाले, आपलीच माणसे सत्तेसाठी धर्मवादी सनातनी सत्ताधाºयांचे पाय चाटतात. हीच माणसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारक्रांतीला पुन्हा १०० वर्षे मागे घेऊन जात आहेत. ७० वर्षे स्वातंत्र्य भोगूनसुध्दा भारतीय समाज भेदाभेदाच्या भयाण अंधारात अडकला आहे. स्वातंत्र्य, समता, एकता हे शब्द फक्त निवडणुकीवेळी मतांसाठीच तोंडी लावले जातात. नेत्यांना समाज आणि राष्ट्रहिताची तसेच नीतीमूल्यांची तळमळ नाही. सामाजिक समतेला, बंधुतेला कोणीच समजून घेत नाही. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या मानवतेच्या विचारांना पेलायला आम्ही कमी पडतो आहोत. समाजातील उपेक्षित घटकांना त्यांचे मूलभूत हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी बंधुता मूल्यांची उपासना केली पाहिजे. बोलक्या सुधारकांपेक्षा क्रियाशील कार्यकर्त्यांची फळी उभारताना बंधुता हीच प्रत्येकाची जीवनप्रणाली झाली पाहिजे.बंधुता परिषदेचे संस्थापक प्रकाश रोकडे म्हणाले, सध्या देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. धोक्यात आलेली लोकशाही वाचवायची असेल, तर प्रत्येकाला ठोस भूमिका घ्यावी लागेल.डॉ. मनोहर जाधव म्हणाले, आजचे वास्तव भयावह आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. बंधुता आणि विज्ञानाचा प्रसार करताना वैचारिक दिशा देणाºया विचारवंतांच्या हत्या झाल्या. विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. मात्र हे लोक थेट हत्या करण्यावर उतरले आहेत. खर्ड्याच्या नितीन आगेची हत्या करणारे सर्वजण निर्दोष ठरले. यावर पुरोगामी महाराष्ट्र व आंबेडकरी चळवळीने प्रश्न उपस्थित केला नाही, हे दुर्दैव आहे.स्वागताध्यक्ष महेंद्र भारती यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. मुख्य संयोजक प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे यांनी महाविद्यालयाच्यावतीने सर्वांचे स्वागत केले. संमेलनात ‘सत्यार्थी’ स्मरणिका, बंधुतेचा परिसस्पर्श आणि बुध्दवासी बाबा भारती यांनी लिहिलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन रहस्य’ या पुस्तकाच्या तिसºया आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. नगरसेवक शहाजी पाटील यांनी आभार मानले.प्रा. वि. द. कदम, प्रा. एन. एस. क्षीरसागर, प्राचार्य एस. बी. माने, प्रा. राजा माळगी, डॉ. एम. एन. शिंदे, प्रा. व्ही. जी. पानस्कर, एस. टी. माने, प्रा. एकनाथ पाटील, प्रा. सतीश चौगुले, त्र्यंबकेश्वर मिरजकर, एम. जी. पाटील, डॉ. दीपा देशपांडे, वृषाली आफळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.